Posts

Showing posts from October, 2024

*जागो मतदार जागो, अन्यथा ----+--------*

 *जागो मतदार जागो, अन्यथा ----+--------*  लेखक डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे मला आठवतं मी लहान असताना म्हणजे  1980 ते 1990 च्या दशकातील स्थिती होती . आमच्या गावाकडील परिसरामध्ये काही विशिष्ट लोकांची दादागिरी होती त्याचे कारण असे होते की ते संघटित होते आणि त्यामुळे  त्याच्या मनाला जे येईल तसे ते वागायचे . आमच्या शेतकरी बंधूंच्या शेतामधील पीक कापून न्यायचे. भाजी पाला शेतकऱ्यां समोर घेऊन जायचे . आयाबहिनीची छेडछाडी करायचे आणि कोणी प्रत्युत्तर दिलं तर त्याला सर्व मिळून मारायचे. त्यामुळे अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते . पोलिस,कायदा सर्व काही होते पण त्या लोकांना धाक नव्हता. खुले आम आततायी माजली होती. प्रत्येक जण हा चिंतेत ,धाकात ,असुरक्षित होता. त्यावेळेस एक चमत्कार झाला. जनसामन्याची एक संघटना एका देवमाणसाने सुरू केली  . तो देवमाणूस  मुंबईहून आला होता त्याने लोकांना  संघटित केले व सर्व मिळून सामना, प्रत्युत्तर युद्ध कास करायचं ते  शिकवले . आणि याचे फलस्वरुप ते लोक घाबरले व नंतर सुरळीत सुरक्षित जीवनमान सुरू झाले .  सांगण्याचा उद्देश की स...
*वसु बारस व पंचगव्य स्नान एक अप्रतिम स्वर्गीय अनुभव* लेखक  प्रा. डॉ जितेंद्र आ होले अध्यक्ष भारतीय शिक्षण मंडळा पुणे महानगर  *वसुबारसच्या* निमित्ताने पांजरपोळ भोसरी पुणे येथे पंचगव्य स्नान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी 8.00 वाजता ह्या प्रोग्रामला सुरवात झाली. सुरवातीला गोशाळेला प्रदक्षिना करण्यात आली त्यामध्ये आयोजकांनी पंचगव्य स्नानाचे महत्व . पंचमहाभूते व आपल्या शरीराचा संबंध तसेच भारतीय पुरातान शास्त्र व त्याचे महत्व उपयोग याचे विश्लेषण करून सांगितले . व यामागील विज्ञान, शास्त्र समजाऊन सांगितले. त्यानंतर सर्व मंडळी ज्ञान ग्रहण करीत गोशाळेतील मध्यवर्ती ठिकाणी जिथे पंचगव्य स्नानाची व्यवस्था केली होती तिथे पोहचली. कमीत कमी 400 जण स्नानाकरिता आले होते. जळगाव ,धुळे, अमरावती कोल्हापूर सातारा ,सांगली ,नांदेड परभणी, अहील्यानगर, संभाजीनगर, इंदापूर, पुणे , पिंपरी चिंचवड,मावळ, मुंबई, पुणे ,नाशिक, अहमदनगर जिल्हा,अश्या विविध ठिकाणची मंडळी आलेली होती. आणि विशेष म्हणजे फक्तं पंचगव्य स्नान साठी एवढे कष्ट घेऊन ही मंडळी आलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद समाधान उत्साह अगदी स्पष्...
*योग्य मतदान सुखी जीवनमान* 🕉️ *केला मतदानास आळस झाला दूर्गतीचा कळस* 💯. *%मतदान* *सर्वांना हात जोडून विनंती आहे की मतदान करा, स्वतः साठी स्वतःच्या मुलाबाळांसाठी त्यांच्या भविष्यासाठी, उज्वल भविष्य व सुरक्षेसाठी मतदान करा* *हीच वेळ आहे काळ समय चे महत्त्व लक्षात घ्या* *मतदान - एक पूण्यकर्म* *चुकीचा निर्णय भविष्याशी खेळ* *डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे* ( सदरहू लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून याचा विपरीत अर्थ लावू नये यामागे फक्तं एकच हेतू उद्देश आहे की सर्वांनी योग्य व्यक्तीला मतदान करावं व भविष्य सुखरूप सुरक्षित आनंदित उज्वल करावं ) संध्याकाळची वेळ होती प्रसन्न वातावरण होते. श्याम व राम हे दोघे मित्र गप्पा मारत होते. श्याम म्हणत होता, मी कोणालाच मतदान करणार नाही कारण सर्वच राजकारणी सारखेच आहेत. फक्त स्वतः चा स्वार्थ बघतात . खुर्चीची हाव असते. खुर्चीसाठी ते काहीही करायला तयार असतात. लोकांची , समाजाची देशाची सेवा करायच्या नावाखाली राजकारण करत असंतोष पसरवत असतात. आणि जातीच्या, धर्माच्या, महागाई च्या नावाखाली आपसात भांडण करीत असतात . तेव्हा राम बोलू लागला अरे मित्...
*दांडिया गरबा खेळातिल विकृत षड्यंत्र* (*अतिशय थोडके आणि महत्वाचे पण माझे विचार*) लेखक : डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे " या देवी सर्व भुतेशू शक्ती, मातृ पितृ,लक्ष्मी रुपेन संस्थिता ! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!! हे देवी आम्हा सर्वांवर कृपादृष्टी ठेव आमच्यावर दया कर व आम्हाला सर्वांना सुख शांतता आनंद समाधान कीर्ती समृध्दी आरोग्य आयुष्य बुद्धी, ऐश्वर्य प्रदान कर आणि आम्ही यासाठी हे माते तुला शरण आलो आहेत आणि कृपादृष्टी ठेवून आम्हाला आध्यात्मिक, भौतिक, शारीरिक ,मानसिक, आधिदैविक शक्ती देवो या करिता देवीची पूजा केली जाते. खरच खूप उत्साहाचे वातावरण असते . ऋतू बदल झालेला असतो पावसाळा संपून हिवाळ्यात प्रवेश केलेला असतो त्यामुळे शरीरात पण बदल झालेला असतो. वात पित्त कफ प्रकृतीत बदल झालेला असतो . आणि त्यामुळे शरीरात होणारे आजार टाळण्यासाठी उपास , आहार बदल, म्हणजे सात्विक आहार ,मानसिक शांती साठी पूजा ,ध्यान सांगितलेले आहे . वातावरण शुद्धीसाठी होम हवन ,यज्ञ सांगितले आहे. अतिशय शास्त्रीय आणि सहज कार्य प्रणाली आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत सांगितली आहे. पण...... आजची परिस्थिती कठीण आ...