QS रँकिंग म्हणजे काय? डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे आजकाल सगळीकडे चर्चा सुरू आहे की QS आणि NIRF रँकिंग म्हणजे काय? QS रँकिंग म्हणजे Quacquarelli Symonds या ब्रिटनमधील शिक्षण व संशोधन क्षेत्रातील संस्थेद्वारे दरवर्षी प्रकाशित केले जाणारे जागतिक विद्यापीठांचे क्रमांकन (World University Rankings) होय. ही रँकिंग जगातील विद्यापीठांची तुलना करून त्यांच्या गुणवत्तेचा अंदाज लावण्यासाठी केली जाते. QS रँकिंगचे प्रमुख घटक (Main Parameters of QS Ranking): १) Academic Reputation (शैक्षणिक प्रतिष्ठा) – जगभरातील प्राध्यापक, संशोधक आणि तज्ञ यांच्याकडून मिळालेल्या मतांवर आधारित मूल्यांकन: 40% २) Employer Reputation (नियोक्त्यांची प्रतिष्ठा) . पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगार देणाऱ्या उद्योगांच्या मतांवर आधारित.: 10% ३)Faculty/Student Ratio (शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर) – प्रत्येक विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक उपलब्ध आहेत यावर आधारित: 20% ४)Citations per Faculty (प्राध्यापकांमागे संशोधन संदर्भसंख्या) – संशोधनातील गुणवत्ता आणि प्रभाव मोजण्यासाठी : 20% ५)International Faculty Ratio (आंतरराष...
Posts
- Get link
- X
- Other Apps
शिक्षणातील दोन बाजू : शिक्षकाचा छळ आणि विकृत शिक्षक मानसिकता डॉ. जितेंद्र आत्माराम होले, पुणे शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे — तोच विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची ज्योत प्रज्वलित करतो. पण आजचा हा दीपस्तंभ दोन टोकांच्या वाऱ्यांत अडकला आहे. एका बाजूला व्यवस्थात्मक दबाव, अहवालांची भीती आणि अपमानाचा छळ आहे, तर दुसऱ्या बाजूला काही शिक्षकांच्या विकृत मानसिकतेतून निर्माण होणारा नकारात्मक वातावरणाचा धोका आहे. आज शिक्षण क्षेत्रात NBA, NAAC, NIRF, AICTE यांसारख्या मानांकन प्रक्रियांचा प्रचंड भार शिक्षकांवर टाकला जातो. हेतू चांगला असला तरी पद्धतीने शिक्षकांचा आत्मसन्मान हिरावला आहे. शिक्षकाचा वेळ अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांसोबत घालवण्याऐवजी फाईल्स, रिपोर्ट्स आणि ऑडिटमध्ये हरवतो. शिक्षक “ज्ञानदाता” नसून “कागदपत्रे भरणारा कर्मचारी” म्हणून ओळखला जातो — हाच शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा अपमान आहे. अधिकाऱ्यांची वृत्ती "आदेश देणारी" झाली आहे, "समजून घेणारी" नाही. “हे आजच हवं!”, “तुम्ही काहीच केलं नाही!” — अशा शब्दांनी शिक्षकाच्या आत्मसन्मानावर वार होतात...
- Get link
- X
- Other Apps
मायासुर – भारतीय ज्ञानपरंपरेतील अभियंता लेखक - डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे ठिकाण - राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे संवाद - शिक्षक व विद्यार्थी मुलांनो, दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस म्हणून का साजरा केला जातो? उत्तर - कारण या दिवशी भारत रत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (M. Visvesvaraya) यांचा जन्मदिन आहे. शिक्षक - आजच्या या पवित्र दिवशी मी तुम्हा भारतीय ज्ञान परंपरेतील एक अभियंता मयासुर / मायासुर याच्या बद्दल माहिती सांगणार आहे . शिक्षक व्याख्यान - भारतीय पुराणकथांमध्ये मायासुर हा असुरांचा वास्तुशिल्पज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने वास्तुशास्त्र, शिल्पकला, यंत्रविद्या आणि नगररचना यामध्ये अप्रतिम कौशल्य प्राप्त केले होते. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर तो एक तंत्रज्ञ अभियंता व नगररचनाकार होता. अभियंता म्हणून त्याचे योगदान हे अविस्मरणीय आहे त्याने इंद्रप्रस्थ येथे पांडवांसाठी त्याने बांधलेली मायासभा ही अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना मानली जाते. तिच्यात प्रकाश, ध्वनी, आरसे, पाणी व जमिनीचे विलक्षण ...
- Get link
- X
- Other Apps
चहा - दर्शन ( philosophy) - *आजचा गमतीदार विषय* डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे ( कृपया हे माझे वैयक्तिक मत आहे) चहा पिणे ही अत्यंत सामान्य व साधारण बाब आहे पण यामध्ये गमतीदार भाग म्हणजे चहा पिणारे आणि पाजनाऱ्यांचे प्रकार व त्यांचे स्वभाव विशेष पुढील प्रमाणे - १) मीटिंग किंवा सभे मध्ये चहाच्या कपावरून अधिकारी आणि सामान्य कर्मचारी लक्षात येते. अधिकाऱ्याला विशेष स्वतंत्र कप व सामान्य कर्मचारीला साधे प्लास्टिक ,कागदाचे कप हा फरक. २) मीटिंग मध्ये बसलेल्या काही विशिष्ट लोकांना चहा देणे यावरून असे ओळख्याचे की ते अधिकारी हलकट आहेत आणि वाटप करणारे निकृष्ट दर्जाचे फक्त भंगार वर्गिकरणाचे आहे . ३) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर उत्तम असेल तर ती व्यक्ती महत्वाची असून गृहिणी ही उच्च विचार श्रेणीची आहे . ४) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर मध्यम असेल तर ती व्यक्ती सामान्य ,मध्यम असून गृहिणी ही राजकीय विचार श्रेणीची आहे म्हणजे ती असा विचार करते की मी चहा देऊन आदरसत्करही करते व यातच माझे पैसे वाचाविते म्हणजे दोन्ही खुश. ५) अतिथी म्हणून गेल्यावर चहा जर निकृष्ट दर्जाचा असेल तर ती व्यक्ती ...
- Get link
- X
- Other Apps
*शिक्षक व विद्यार्थी मूल्यांकन* *सत्यता की दांभिकता?* डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे संध्याकाळची वेळ होती. कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो. शिक्षक असल्यामुळे साहजिकच शिकणे ,शिकविणे यावर चर्चा होत होती. त्यामध्ये विद्यार्थी मूल्यांकन हा महत्वाचा मुद्दा समोर आला. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे होते. १) उत्तम मांडणी सध्या सरळ भाषेत समजावून सांगणे २) अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून शिकविणे व नोट्स उपलब्ध करून देणे ३)शिक्षक म्हणून वर्गात शिकविण्याच्या पद्धती प्रभावी आणि विद्यार्थ्यांच्या विकासास पूरक असाव्यात. ४) विद्यार्थी-केंद्रित अध्यापन असायला पाहिजे . (Student-Centered Teaching) ५)विद्यार्थ्यांच्या गरजा, गती, आणि आवडीनुसार अध्यापन करायला पाहिजे . ६);प्रश्नोत्तरे, चर्चासत्रे, आणि गटकाम यांचा समावेश करायला पाहिजे. ६)विद्यार्थ्यांना विचार करण्यास आणि उत्तर शोधण्यास प्रवृत्त करायाला पाहिजे. ७) उदाहरणांद्वारे शिकवायला पाहिजे . (Teaching through Examples) प्रत्यक्ष उदाहरणे, गोष्टी, किंवा दैनंदिन जीवनातील संदर्भ वापरून विषय समजावून सांगणे यामुळे...
- Get link
- X
- Other Apps
NIRF म्हणजे काय? उद्देश योग्य दिशा मार्गदर्शक लेखक - डॉ जितेंद्र आत्माराम होले पुणे NIRF म्हणजे (National Institutional Ranking Framework). ही भारत सरकारच्या *शिक्षण मंत्रालयाची* एक योजना आहे, ज्याद्वारे दरवर्षी भारतातील उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि कामगिरीवर आधारित *रँकिंग (क्रमवारी)* दिली जाते. *NIRF रँकिंगचे प्रमुख गट (Categories):* NIRF वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रांसाठी रँकिंग देते: 1. एकूण (Overall) 2. विद्यापीठ (University) 3. अभियांत्रिकी (Engineering) 4. व्यवस्थापन (Management) 5. औषधनिर्माण (Pharmacy) 6. कायदा (Law) 7. वैद्यकीय (Medical) 8. आर्किटेक्चर (Architecture) 9. डेंटल (Dental) 10. कृषी आणि संलग्न क्षेत्र (Agriculture & Allied Sectors) 11. संशोधन (Research) 12. नवोन्मेष (Innovation) NIRF रँकिंगसाठी वापरले जाणारे *पाच मुख्य निकष (Parameters)* 1. *अध्यापन, शिक्षण आणि संसाधने (Teaching, Learning & Resources – TLR) – 30%* शिक्षकांची गुणवत्ता व संख्या व शिक्षकाची गुणवत्ता ही त्याचा अनुभव व उच्च शिक्षण म्हणजे PhD डिग्री आणि नंतर त्याने केले...
- Get link
- X
- Other Apps
लोकनेता/नगरसेवक कसा असावा ? राष्ट्रहितासाठी अतिशय महत्वाचे Dr Jitendra Atmaram Hole Pune ( या लेखातील विचार हे लेखकाचे खाजगी विचार आहेत कोणीही अर्थाचा अनर्थ करू नये. कोणत्याही व्यक्तीशी संबंधित नाही . आणि विनंती आहे की लेखातील मजकूर जसा आहे तसाच पुढे फॉरवर्ड करावा. ) आपले व आपल्या विभागाचे / राष्ट्राचे / नगराचे भविष्य म्हणजे लोकनेता/ नगरसेवक निवड लोकनेता/ नगरसेवकची निवड ही सामान्य नागरिकाच्या मतांच्या आधारावर होणार असते . पण आपण लोकनेता/ नगरसेवक निवडताना काही महत्वाची बाबींचा विचार करायला पाहिजे. आपण सुरवातीला नगरसेवक / लोकनेता कसा असावा याबद्दल विविध धर्म ग्रंथाचा संदर्भ घेऊन संकलित केलेली नाही ती अशी :चाणक्यनीती नुसार लोकनेता/नगरसेवकाने व्यवहारकौशल्य व धोरणात्मक दूरदृष्टी ठेवावी. कृष्णनीती नुसार नगरसेवकाने सेवाभाव , न्यायप्रियता व लोकसंग्रह साधावा.विदुरनीती नुसार नगरसेवकाने सत्यनिष्ठा , धर्मनिष्ठा व प्रजेसाठी त्यागभाव ठेवावा. धर्मशास्त्रानुसार नुसार नगरसेवक धर्मपालक व प्रजासुरक्षक असावा. अर्थशास्त्रानुसार...