Posts

Showing posts from November, 2024

डिंकाचे लाडू*(कल्पक कथा

 *डिंकाचे लाडू*(कल्पक कथा) एक आटपाट नगर होते त्या नगरात नरेंद्र नावाचा एक गृहस्थ राहत होता . संध्याकाळच्या वेळेला मित्रांसोबत गप्पा मारत असताना आपल्या आवडत्या खाण्याच्या पदार्थांवर चर्चा होत होती त्याच वेळेस प्रत्येक जण आपापल्या आवडत्या खाण्याच्या पदार्थांचे नाव सांगत होते आणि तो का आवडतो आणि तो मिळण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात यावर बोलत होते . थोड्यवेळाने नरेंद्र अतिशय गंभीरता पूर्वक बोलू लागला. नरेंद्र म्हणाला. डिंकाचे लाडू म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटले का? हो माझ्या पण . !! जगामध्ये माझ्या आवडत्या पदार्थापैकी एक. गावात डिंकाचे लाडूचां तयार होण्याचा वास आला की मी नकळत त्या घराजवळ जाऊन उभे राहायचो . माझ्या आयुष्यात डिंकाच्या लाडूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.  मी लहान असताना म्हणजे पाच वर्षाचा असताना माझी मोठी बहीण बाळंतपणासाठी आमच्या घरी आली होती. आमच्या घराची परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे बहिणीसाठी लाडू व सुका मेवा आणायची आमची ऐपत नव्हती. म्हणून बहिणीच्या जेठाने लाडूचा सामान आणून दिला व तिच्या नणंदने ते तयार करून दिले.  झाले मी शाळेत गेलो होतो ,!! घरी आल्याव...

जर जीवनच नसेल तर कसले कार्य आणि काय?

 *जर जीवनच नसेल तर कसले कार्य आणि काय?* डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे  (Thermal Engineering Teacher ) (हे माझे वैयक्तिक सकारात्मक विचार आहेत .कोणीही याचा वेगळा अर्थ घेऊ नये. ) आज सर्वात महत्वाची घडामोड आणि उद्देश एकच sustainable development goals.  मित्रानो विचार करा . जर मानवाच्या चुकीमुळे ,दुष्कर्मामुळे जर पृथ्वी मातेचेच अस्तित्व धोक्यात येत असेल तर काय करायच्या बाकीच्या घडमोडी.  धन ,संपत्ती, अधिकार ,पद, राजनीती, मुल बाळे, सर्वच प्रिय जन व आपले अस्तित्वच नाही तर कश्याला एवढ्या घडामोडी. मित्रानो मी 27वर्ष thermodynamic हा विषय शिकवला आहे . जगातला कोणत्याही आयआयटी ,NIT किंवा टॉप विद्यापीठाच्या thermodynamic च्या प्राध्यापकाला विचारा. Thermodynamic च्या तीन नियमाप्रमाणे हे संपूर्ण विश्व संचालित होत असते . यावर मी मागे अनेक लेख लिहिलेले आहे त्याबद्दल मी चर्चा करणार नाही. पण entropy या thermodynamic च्या मुद्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित करू इच्छितो.प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला ,प्रत्येक कार्याला ही वातावरणात वाढत आहे . त्यामुळे बाहेरील वातावरणाची उष्णता व...

राजकारणातील महाभारत

 *राजकारणातील महाभारत* कर्ण अतिशय दानशुर , सज्जन ,चांगला गुहस्थ होता, द्रोणाचार्य अतिशय उत्तम शिक्षक होता, भीष्माचार्य अतिशय सन्माननीय बुद्धिमान, शक्तिमान गृहस्थ होता. पण पक्ष कौरवांचा होता. संगत सोबत, दुर्योधन, दुःशासन ,शकुनी यांची होती. आता हे लोक वाईट होते का ?  सामान्य नागरिकांसाठी . तर उत्तर आहे,  नाही . त्यांनी पण समाजासाठी लोकांसाठी कार्य केले पण त्याच्याजवळ *अभिमान, क्रोध, लोभ, स्वार्थ*.हे अवगुण यांच्याकडे होते. आणि ते एकत्रित येऊन षड्यंत्र रचायचे . तसेच पांडव पण द्युत मध्ये स्वतः च्या पत्नीला धन म्हणून हरले. पण धर्म पांडवांच्या बाजूने होता .आता धर्म म्हणजे युधिष्ठिर नाही. धर्म म्हणजे नीतिमत्ता, विवेक शिलाता , नम्रता, सतशिलाता असल्यामुळे . भगवान श्री कृष्ण यांच्या बाजूने होते.आणि श्री कृष्ण जिथे तिथे विजय नक्कीच. तसेच राजकारणातील राजकीय पक्षांचे पण असेच असते. सगळीकडे कर्ण ,द्रोणाचार्य,भीष्म ,अर्जुन ,युधिष्ठिर असतात. पण भगवान श्री कृष्ण फक्त एकाच पक्षाकडे असतो. आणि शकुनी मामा पण एकाच पक्षाकडे असतो. म्हणून हे राजकीय युद्ध होत असते. आता कलियुगामध्ये कोण श्री कृष्ण आण...

निवडणुकीतील अर्जुन

 *निवडणुकीतील अर्जुन* (भगवत गीतेतील दिव्य ज्ञान संभ्रमातील अर्जुन साठी अमृत) डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे  9860659246 (  हा लेख भगवत गीतेतील श्लोकांचा संदर्भ घेऊन काल्पनिक रित्या तयार करण्यात आला आहे.) रात्रीची वेळ होती,  विधानसभेच्या निवडणुकीत अर्जुन उमेदवार होता . प्रचंड अश्या गोंधळात गर्दीमध्ये , उत्साहात प्रचार सुरू होता. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार  असल्यामुळे जबाबदारी ,कर्तव्य होते.  अर्जुन विचार करत होता की माझ्या विरुद्ध माझे मित्र ,नातेवाईक ,मामा, काका,आजोबा, सासरे, मेव्हणे , वडील   व  समतुल्य मंडळी उभी आहेत . मी असा काय यांचा गुन्हा, अपमान केला आहे की हे लोक माझा द्वेष करीत आहे तसेच मी यांची कोणती आर्थिक, मानसिक शारीरिक हानी  केली आहे की ही मंडळी माझ्याविरुद्ध झाली . खूप वाईट दुःख वाटत होतं आणि प्रचंड थकवा आल्यामुळे गाढ झोप केव्हा आली समजलेच नाही.  कितीतरी वेळ झोपेत होतो पण कुठल्यातरी आवाजाने जाग आली आणि आणि डोळ्यासमोर रात्रीचे स्वप्न सचित्र आले .   अर्जुनने बघितले महाभारतातील युद्ध आणि युद्धामध्ये  अर्जुन ...

*दीन दुबळ्याची दिवाळी*

 *ओट्यावरील गप्पा* *दीन दुबळ्याची दिवाळी* लेखक डॉ. जितेंद्र आत्माराम होले पुणे  (सदरहू लेखक व लेखातील मित्र राजकारणी नाहीत. यांच्या गप्पा ,चर्चा ह्या सामान्य माणसाच्या चर्चा आहेत याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. ) चार मित्र दिवाळीच्या सुटी निमित्त गावाला आलेले होते. बऱ्याच दिवसांनी भेट झाली त्यामुळे गप्पा फारच रंगल्या होत्या. विषय बरेच होते. पण त्यात मुख्य विषय होता राजकारण, आणि त्यात लाडकी बहीण योजना . एक मित्र बोलू लागला सरकारने ही योजना आणल्यापासून महिला वर्गाची खूप मजा झाली. काही काम न करता 1500 रुपये मिळतात. दुसरा म्हणाला हे आपलेच पैसे आहेत सरकार ते त्यांना देत आहे. तिसरा म्हणाला पण तुम्ही काहीही म्हणा आज गावागावात दिवाळी मोठ्या उत्साहाने आनंदात साजरी होतेय कारण आज बऱ्याच अश्या वृद्ध , गरीब, असहाय महिला आहेत त्यांना यामुळे गोड धोड खायला मिळाले , चांगले कपडे परिधान करायला मिळाले त्यांची दिवाळी अतिशय उत्तम रीतीने साजरी झाली.  पण खरंच मित्रानो , मागच्या काही वर्षातील परिस्थिती बघा. काय वातावरण होते दिवाळीला . काही विशिष्ट लोकांची दिवाळी साजरी व्हायची . बाकी...

गोवर्धन पूजा, परिक्रमा आणि अन्नकूट उत्सव*

 *आयुष्यातील रोमांचकारी क्षण वृजवनामधील अप्रतिम अनुभव* *गोवर्धन पूजा, परिक्रमा आणि अन्नकूट उत्सव* (भारतामध्ये गोवर्धन पूजा व अन्नकूट साजरी करण्याची पद्धत अलग अलग आहे . बऱ्याच मंंदििरांमध्ये व  गोशाळे मध्ये  गोमाते च्या शेणाचा ढीग तयार करून श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेऊन त्याची पूजा व प्रदक्षिणा केली जाते. व नंतर छप्पन भोग प्रसाद दाखविला जातो.त्यानंतर सर्व प्रसादाचे वाटप केले जाते. हा अतिशय अविस्मरणीय अनुभव क्षण असतो) लेखक डॉ. जितेंद्र आ.होले पुणे  मुंबई हून राजधानी एक्सप्रेस ने दिल्लीला पोहचलो. दिल्लीला मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी मथुरेला गेलो. प्रथमच श्रीकृष्णाच्या नगरीत प्रवेश करत होतो. तिथे आम्ही गोकुळ रस्तावर एक हॉटेल बुक केले होते. हॉटेलला थोडा आराम केला आणि आम्ही गोकुळ च्या दिशेने निघालो . प्रथमच गोकुळच्या यमुना मैया चे दर्शन झाले. मनामध्ये असंख्य कथा ,गवळण, गीत सशब्द उभे राहिले. आम्ही तिथे नदीच्या काठी एक सुंदर रेस्टॉरंट मध्ये नाष्टा केला आणि गोकुळ गावात प्रवेश केला असंख्य कथा आठवल्या .आणि मी मंत्रमुग्ध होऊन गावातून चालू लागलो तोच एक मार्गदर्शक समोर...